Thursday 4 December 2014

तत्त्वभान ४७ भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राकडे .. ०४ डिसेंबर २०१४ लोकसत्ता


भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राकडे ....

श्रीनिवास हेमाडे 
शेतीच्या नीतिशास्त्राचे पाश्चात्त्य प्रारूप भारतालाही लागू पडेल, असे नव्हे. महात्मा जोतिबा फुले, कॉ. शरद् पाटील, शरद जोशी ते वंदना शिवा आदींनी केलेल्या मांडणीआधारे पुढील पावले  उचलता येतील का?

इतर कोणत्याही गोष्टीची वाट पाहाता येते, पण शेतीविकासाची नाही.
         शेतीचे तत्त्वज्ञान, शेतीचे नीतिशास्त्र या दोन संकल्पना आणि शेती, शेतकरी, शेतीउत्पादने हा विषय पाश्चात्त्य-युरोपीय अ‍ॅकेडेमिक विचारविश्वाच्या आज अग्रस्थानी आहे. 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' आणि 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' हा विषय भारतीय अ‍ॅकेडेमिक विचारविश्वाच्या आणि शासकीय, प्रशासकीय निम्नसूचीतही कधीही आलेला नाही; पण आता तो अंमलबजावणीच्या पातळीवर अगदी ऐरणीवर अग्रस्थानी आणणे अत्यंत निकडीचे आहे. 
          या दोन्ही संकल्पनांचे देशी आणि समकालीन भारतीय प्रारूप बनविण्याकरिता काय करावे लागेल? उदाहरणार्थ, एक प्रारूप पाहू. ते असे : अमेरिकेतली नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सटिीच्या धर्म आणि तत्त्वज्ञान विभागाने नुकताच 'अन्नाचे तत्त्वज्ञान प्रकल्प' (द फिलॉसॉफी ऑफ फूड प्रोजेक्ट) सुरू केला आहे. तात्त्विक संशोधनाचा एक मूलभूत विषय म्हणून शेती आणि अन्न हा चर्चाविश्वात अग्रस्थानी आणणे, त्यातील नव्या तात्त्विक संशोधनाची माहिती राज्यकत्रे, धोरणकत्रे व सामान्य लोकांना देणे या विषयातील आंतरविद्याशाखीय संशोधकांना व इतर जिज्ञासू मंडळींना एकत्र आणणे हे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. शेतीचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र अशा मुख्य शाखा विकसित करून शेतीचे तत्त्वज्ञान ही नवी रचना ते निर्माण करीत आहेत. त्याचप्रमाणे अन्नाचे राज्यशास्त्र, अन्नतंत्रज्ञान आणि अन्नाशी जोडला गेलेला माणसाचा आत्मपरिचय व सामाजिक न्यायाचे वितरण (फूड आयडेंटिटी अँड जस्टिस) या विषयांचाही समावेश त्यांनी शेतीच्या तत्त्वज्ञानात केला आहे. त्यावर आधारित अभ्यासक्रम अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये, शाळा येथे शिकविले जातात. शेती, शेतीतील प्रत्येक कृती आणि शेतकऱ्यावर प्रेम (म्हणजे त्याचे अस्सल वास्तव कल्याण) हा शेतीच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा कायम ठेवून अनेक दृष्टिकोनांतून अभ्यास, संशोधन व लेखन यात होते आहे. या समग्र अभ्यासाची गंभीर दखल घेऊन सरकार, न्याय विभाग काटेकोर अंमलबजावणी करते.
          अर्थात हे प्रारूप आपणाला लागू पडेल किंवा तेच स्वीकारले पाहिजे, असे नाही. भारतीय शेतीचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र रचून आपण आपले देशी 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' विकसित करू शकू. काहीएक सुरुवात करणे आवश्यक आहे. 
            पाश्चात्त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानात शेतीधोरण शोधले तसे आपणही आपल्या तत्त्वज्ञानात काही बीज सापडते का ते पाहावयाचे, त्यात समकालीन कालसुसंगत भर टाकावयाची आणि त्यातून 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' विकसित करावयाचे. उदाहरणार्थ, कृषिसूक्त, भूमिसूक्त, अन्नसूक्त यांना आणि अन्नाचे रूप धारण करणारे देव आणि अन्नाची इच्छा व्यक्त करणाऱ्या शेकडो ऋचांना ज्येष्ठ विचारवंत स. रा. गाडगीळ अन्नब्रह्मवाद (फूड फिलॉसॉफी) म्हणतात. जमिनीचे व्यवस्थापन, निगराणी, महसूल आणि शेती व्यवसायाचा धोरणात्मक विचार बादशहा अकबर, त्याचे अधिकारी राजा तोडरमल आणि मुझफ्फर खान या अधिकाऱ्यांनी आणलेली मनसबदारी पद्धती, छत्रपती शिवरायांची 'आज्ञापत्रे', त्यानंतर म. जोतिराव फुल्यांच्या लेखनात आढळतो. इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च या भारतातील तत्त्वज्ञानाच्या शिखर संस्थेने बाराव्या शतकापर्यंतचा भारतीय शेतीचा इतिहास खंड रूपाने (सं. लल्लनजी गोपाल, व्ही. सी. श्रीवास्तव) प्रसिद्ध केला आहे. त्यात अनेक आधार मिळू शकतात.
           शेतीकडे अर्थव्यवस्थेचा कणा व जीवनाचे इहवादी तत्त्वज्ञान म्हणूनच पाहणे हे भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान या विषयाची तात्त्विक बाजू मानता येईल. नियती, नशीब, कर्मफळ, जातिव्यवस्था, स्त्रीशोषण यांचा पुरस्कार करणारे पारंपरिक जीवनविषयक तत्त्वज्ञान; त्यावर आधारित पुराणे, कथा, प्रवचने इत्यादी साहित्याचा त्याग करणे आणि नवे शेतीपूरक, शोषणरहित, समतापूर्ण सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे विचार परंपरेत शोधणे किंवा निर्माण करणे, जगातील ज्या तत्त्वज्ञानातून अशी तत्त्वे मिळतील तिथून ती आत्मसात करणे, त्यांचा समावेश करून या नव्या तत्त्वज्ञानाची रचना करणे ही भारतीय शेतीच्या तत्त्वज्ञानाची काही आधारभूत तत्त्वे मानता येतील.
            शेतीला प्राधान्य देणारे भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान रचले गेले की भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचता येईल. त्यासाठी भारतीय शेती व्यवसायाचा इतिहास, विद्यमान स्थिती आणि आधुनिक जागतिक नीतिव्यवस्था यांची सांगड घालणे आवश्यक आहे. भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राचा मुख्य विषय भारतीय समाजजीवनास चपखल लागू असणारी सार्वजनिक धोरणे निश्चित करणे हा आहे. पण भारतीय शेतीक्षेत्राचा इतिहास पाहिल्याशिवाय भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे फार कठीण आहे. भारताला विस्तीर्ण भूगोल आणि जडशीळ ओझं बनलेला प्रदीर्घ इतिहास आहे. तो शेती इतिहासाबरोबर वर्णजाती-जमाती व िलगभेदग्रस्त शोषणव्यवस्थेचाही इतिहास आहे. कॉ. शरद पाटील, देबिप्रसाद भट्टाचार्य, आ. ह. साळुंखेवंदना शिवा यांच्यासारख्या अनेक तज्ज्ञांनी त्या इतिहासावर बोट ठेवले. भारतीय शेतीचे आधुनिक नीतितत्त्वज्ञ म्हणून म. जोतिराव फुले आणि कॉ. शरद पाटील आणि समकालीन शेतीनीतिशास्त्रज्ञ म्हणून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे नाव घेणे अनिवार्य आहे. 
        'आम्ही आपल्या स्थानिक गरजेवर आधारित शेतीनीतिशास्त्राची व्याख्या कशी करावी? ही आमची समस्या आहे', असा प्रश्न आधुनिक काळातील शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उपस्थित केला पाहिजे. आधुनिक विद्य्ोची जोड देऊन विद्यमान भारतीय समाजव्यवस्था आणि भारतीय मानसव्यवस्था लक्षात घेऊनच सार्वजनिक हिताची धोरणे शेतीनीतिशास्त्राच्या सूचीत निश्चित करता येतील. समाजसेवा (सोशल सव्‍‌र्हिस), व्यवसाय (प्रोफेशन), धंदा (बिझनेस), आवडीचा छंद (व्होकेशन), नफेखोरीचा धंदा (ट्रेड), उद्योगसमूह (कॉपरेरेशन/ कंपनी) यातील नेमके काय म्हणून शेतीकडे पाहावायचे हे धोरण ठरविणे हा भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राचा कळीचा प्रश्न मानता येईल.
             शेतीचे नीतिशास्त्र हा प्रकल्प राबविण्याकरिता पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी उपयोजनात आणलेली वैचारिक उपकरणे, साधने व पद्धती यांचा पुरेपूर उपयोग 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' रचताना होऊ शकतो. त्यांना भारतीय तत्त्वज्ञानातील आणि इतर विचारविश्वातील वैचारिक उपकरणे, साधने व पद्धती यांची जोड देता येईल. त्यास 'भारतीय शेतीचे तर्कशास्त्र' म्हणता येईल.
         या विद्याशाखा आकारल्यानंतरच त्यांचा समावेश शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर करता येईल.
            जगात सर्वत्र तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात शेती तत्त्वज्ञान व शेती नीतिशास्त्रविषयक व्यापक वैचारिक साहित्य निर्माण करण्याचे काम वेगात सुरू आहे. विशेषत: अमेरिकन विद्यापीठात अनेक पदव्या, अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. जगप्रसिद्ध भिख्खू बुद्धदास (१९०६-१९९३) यांची शेतीधम्म (अ‍ॅग्री धम्मा) ही संकल्पना लिंडसे फालयेव या विचारवंताने थाई भाषेतून इंग्रजीत आणली आहे. फूड पॉलिटिक्स (मेरीओन नेसले २०१३)फिलॉसॉफी ऑफ फूड (सं. डेविड काप्लान, २०१२)फूड अँड फिलॉसॉफी (फ्रित्झ ऑलहॉफ, डेव मनरो, २००७)कुकिंग, ईटिंग, िथकिंग : ट्रान्सफॉरमेटिव्ह फिलॉसॉफीज ऑफ फूड (डीएन कर्टीन, लिसा हेल्डेक, १९९२) ही पाश्चात्त्य ग्रंथांची वानगीदाखल काही नावे.
       भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ, अधिकारी वर्ग, शेतीतज्ज्ञ, शेतीशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, क्षेत्रीय अभ्यासक, शेतकरी संघटना, माध्यमे, बिगरसरकारी संस्था, रसायन, भूगोल, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र, अभियांत्रिकी या विषयांतील तज्ज्ञ, सीए इन्स्टिटय़ूट, तत्त्ववेत्ते व व्यावसायिक तत्त्ववेत्ते आणि आणखीही गरजेनुसार इतर तज्ज्ञ आणि कार्यकत्रे यांनी एकत्र येणे तातडीचे आहे.

Live Paper Link                 E-Paper Link 

तत्त्वभान ४६ पूर्वार्ध - शेतीचे नीतिशास्त्र - वेद व महाकाव्ये २७ नोव्हेंबर २०१४ लोकसत्ता


Ethics in Agriculture
शेतीचे नीतिशास्त्र - 
वेद व महाकाव्ये

श्रीनिवास हेमाडे 
शेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते. अर्थात, भारतात 'शेतीचे नीतिशास्त्र' असे वेगळे कोणी लिहिले नाही. आहे ते स्फुटलेखन, हेही खरे..
        'शेतीचे नीतिशास्त्र' ही पाश्चात्त्य आणि आंग्लेतर- उर्वरित युरोपीय (काँटिनेंटल) तत्त्वज्ञानातून विकसित होत असलेली संकल्पना आहे. भारतीय शेतकरीवर्ग, शेतकरी संघटना नेते, कार्यकर्ते, धोरणकर्ते, शेती मंत्रालय आणि शासन तसेच अभ्यासक, विचारवंत इत्यादींच्या विचारविश्वात ती नवी आहे, यात शंका नाही. राजकारणात 'शेतकरी राजा' या नामाभिधानाने मिरविणाऱ्यांनाही ती नवी असू शकते. भारतातील विद्यापीठीय-महाविद्यालयीन स्तरावरील अ‍ॅकेडेमिक विश्वातही ती नवीच आहे. 
         'शेतीचे तत्त्वज्ञान' आणि 'शेतीचे नीतिशास्त्र' या नावाची स्वतंत्र विद्याशाखा निर्माण होईल, इतके मुबलक साहित्य वैदिक आणि अवैदिक (तांत्रिक व लोकायतसह) विचारविश्वात उपलब्ध आहे की काय हे शोधावे लागेल. अर्थात भारतीय संस्कृती शेतीप्रधान असल्याचा दावा करताना निश्चित शेतीविचार भारताकडे आहे, असे म्हणावयाचे असते आणि तसे विचार भारतीय वाङ्मयात आहेत. पण ते सारे स्फुटलेखन आहे. त्या लेखनाचे स्वरूप पाहू. 
        वेदविषयक साहित्यात भूमिसूक्त, कृषिसूक्त व अक्षसूक्त या तीन सूक्तांमध्ये पर्यावरणविचार व शेतीविचार आणि अन्यत्र काही तुरळक आनुषंगिक विचार मांडला आहे. अथर्ववेदातील भूमिसूक्त (अथर्ववेद १२.१) पृथ्वी ही सर्वाची आई असल्याचे सांगते ('माता भूमि: पुत्रो? हं पृथिव्या:'). ही भूमिमाता सर्व पाíथव पदार्थाची जननी व पोषण करते, प्रजेचे सर्व प्रकारचे क्लेश, दु:खे, अनर्थ यांपासून संरक्षण करते. 
         ऋग्वेदात दोन सूक्ते आहेत. पहिल्या, कृषिसूक्तात (ऋग्वेद ४.५७) शेतीचा उल्लेख 'मानवाचे सौभाग्य वाढविणारी' असा आहे. नांगरलेल्या जमिनीवर इंद्राने चांगला पाऊस पाडावा, तसेच सूर्याने आपल्या उत्कृष्ट किरणांनी तिचे रक्षण व संवर्धन करावे, अशी इच्छा या सूक्तकर्त्यांने केली आहे. बल नांगराला जोडणे, नांगरटीस सुरुवात करताना, नांगराची पूजा करताना हे सूक्त म्हटले पाहिजे. ऋग्वेदातील दुसऱ्या 'अक्षसूक्त' (१०.३४) मध्ये जुगाऱ्याला केलेला उपदेश या स्वरूपात शेतीचा उल्लेख आहे. कुणी कवष ऐलूषच्या नावावरील ते सूक्त १४ ऋचांचे असून जुगारी आणि अक्ष म्हणजे फासे यांचे दोष व दुष्परिणाम मार्मिक रीतीने दाखविताना उपदेश केला आहे, की 'शेती कर. फासे खेळू नकोस, संपत्ती असेल तिथेच गायी आणि बायको राहतात.' 
       'अन्नदानसूक्ता'त (ऋग्वेद १०.११७) किंवा धनान्नदान सूक्त या नऊ ऋचांच्या सूक्तात स्वार्थी, अप्पलपोटय़ा माणसाची िनदा केली आहे. स्वार्थीपणा करणे म्हणजे दुसऱ्याचा वध करणे होय, असे सांगून अन्नदानाची महती स्पष्ट केली आहे. या सूक्तास 'भिक्षुसूक्त' म्हणतात. हा श्रीमंतांना केलेला उपदेश आहे. पूर्वजन्माच्या पापामुळे दारिद्रय़ भोगावे लागते, या भयानक गरसमजुतीला जोरदार तडाखा देणारे हे सूक्त आहे. मृत्यू केवळ गरिबांनाच येतो, श्रीमंतांना येत नाही असे नाही. उलट लक्ष्मी चंचल असल्यामुळे श्रीमंत माणूसही क्षणात दरिद्री होऊ शकतो. म्हणून जवळ धन व अन्न असेपर्यंत धनवानाने गरिबांना धन, अन्न यांची दानरूपाने मदत करावी व गरिबांशी मत्री करावी, तेच मित्र आपल्या गरिबीत उपयोगी येतात, असे यात सांगितले आहे. नि:स्वार्थी समाजकर्तव्य सांगणारे हे सूक्त आधुनिक काळातही यथार्थ आहे. 
           सरस्वतीचा उल्लेख नदी आणि देवी असा येतो. सरस्वती म्हणजे सरोवराच्या काठी राहणारी देवता किंवा स्त्री-समूह, पर्यायाने नदीकिनारीची वस्ती. विश्वामित्रनदीसंवाद या सूक्तात महर्षी विश्वामित्र नदीला आई मानतात. अथर्ववेदातील काही मंत्रांना 'पौष्टिक मंत्र' म्हणतात. शेतकरी, धनगर, व्यापारी इत्यादी व्यावसायिकांना यश मिळावे, अशी भावना त्यातून व्यक्त होते. पाकयज्ञ, ग्रामनगरसंवर्धन, कृषिसंवर्धनाचे मंत्र यात आहेत. 
        ऋग्वेदाचा समग्र अर्थ लावणारे 'ऋग्वेदभाष्य'कार आणि शृंगेरीमठावरील आचार्य सायणाचार्य (मृत्यू १३८७) यांनी वेदांतील ब्रह्मणस्पती या देवतेला अन्नपती म्हटले आहे. ही शेतीदेवता आहे. त्यांच्या मते, ब्रह्म म्हणजे सतत वाढणारे! जे सतत वाढते ते अन्नच असते. सायणाचार्य 'ब्रह्म स्तोत्ररूपमन्नं हविर्लक्षणमन्नं वा' अशी व्याख्या करतात. स्तोत्ररूप अन्न हे ब्रह्म आहे आणि आहुती दिले जाणारे अन्न हेसुद्धा ब्रह्मच आहे. पुढे ते म्हणतात, 'अन्नस्य परिवृद्धस्य कर्मण: पति पालयिता' (अन्ननिर्मितीच्या कर्माचे पोषण करणारा म्हणजे शेतकरी.) 'बृह' धातू आणि 'बृंह्' धातू यांचा समान अर्थ वाढत जाणे. 'बृह' धातूपासून ब्रह्म, ब्राह्मण, ब्राह्मणस्पती, बृहस्पती असे शब्द बनतात. म्हणून सायणाचार्य अन्न पिकवितो तो ब्राह्मणस्पती असे म्हणतात. शेतकऱ्याचे ब्रह्म जीवनधारणेशी जोडलेले म्हणून ते अन्न हेच ब्रह्म हे समीकरण या होते. उपनिषदात एके ठिकाणी 'अन्नं ब्रह्म' असे म्हटलेले दिसते. शंकराचार्यानी अन्नपूर्णाष्टकम स्रोताची रचना केली. आर्य शब्दाचा मूळ अर्थ पेरणी करणारा कृषक असा होतो. कुणीतरी पृथुवैन्य नामक आर्य तत्कालीन कृषिक्रांतीचा जनक मानला जातो.
      सुप्रसिद्ध विचारवंत स. रा. गाडगीळ यांच्या मते बहुतेक ऋचांमध्ये, सूक्तांमध्ये अन्नाचीच इच्छा दर्शविली जाते. या ऋषींचे विचार आणि देवदेखील अन्नाचे रूप धारण करतात. युजर्वेदाच्या एका भागाला वाजसनेयी संहिता असे नाव आहे. वाजसन म्हणजे कृषक. वाजपेय यज्ञ म्हणजे अन्न आणि पेय म्हणजे पाणी यासाठी केला जाणारा विधी. तंत्र या शब्दाचा मूळ अर्थही शेती करणे असाच असावा.
          रामायणातील कृषिसंस्कृतीसुद्धा सूचक आहे. सीता म्हणजे नांगरट न झालेली जमीन म्हणून व उपजाऊ सकस जमीन, सीताराम = नांगर वापरून कृषितंत्र जाणणारा, अहल्या = नांगर न फिरलेली, भरड जमीन, तारा = नदीच्या मध्यातील खुली जमीन, मंदोदरी (मंद + उदरी) = विलंबाने पिके देणारी जमीन, द्रौपदी ही जमिनीचेच प्रतीक होती. (जमीन भावांपकी कुणीही कसली तरी तिच्यावर केवळ थोरल्या भावाचाच हक्क असावा, या पुरुषी संस्कृतीला कुंतीने समान वाटणी करून जमिनीच्या तुकडीकरणाचा दावा हाणून पडला.) 
         महाभारतातील बलराम हा नांगरधारी शेतकरीच होता. क्षत्रिय हा शब्दसुद्धा क्षेत्र जो कसतो तो. बौद्ध वाङ्मयातील खेताचा अधिपती तो खत्तीय अशी व्याख्या आहे. कामधेनु = ही जंगले तोडून वस्ती करणारी शेतकऱ्यांची संस्कृती. क्षेत्र कसतो तोच क्षत्रिय, त्याला बौद्ध संज्ञा खत्तीय,हिंदीत शेताला खेत म्हणतात. ऋग्वेदातील मुख्य पशुदेव म्हणजे वृषभ - बल आणि गाय याच आहेत. कामधेनू ही संकल्पनासुद्धा जंगले तोडून मानवी वस्ती करणारी व शेती पिकविणाऱ्या कृषिकांची म्हणजे शेतकऱ्यांची संस्कृती होती. या साऱ्या संदर्भात 'कृषिकेंद्रित वैदिक धर्म आणि संस्कृती' हे प्र. म. ना. लोही यांचे पुस्तक उपयुक्त आहे. 
        आता, हे आणि असे अन्य काही वैचारिक साहित्य 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' या नावाची नवीन वैचारिक घटना निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल का? असा प्रश्न उपस्थित करता येईल. या वैचारिक साहित्यातही अवैदिकांपकी केवळ चार्वाक दर्शनात सुस्पष्ट रूपात शेती, उद्योग, व्यवसायविषयक सामाजिक व नैतिक धोरण दिसते. तेव्हा भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे कसे शक्य होईल, ते या लेखाच्या उत्तरार्धात पाहू.
(उत्तरार्ध पुढील गुरुवारी)



तत्त्वभान ४५ शेतीचे नीतिशास्त्र २० नोव्हेंबर २०१४ लोकसत्ता

शेतीचे नीतिशास्त्र

श्रीनिवास हेमाडे

       शेती वैयक्तिक मालकीची असूही शकेलपण लोकशाही आणि 'जगण्याचा समान हक्कमानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या शाखेच्या रुजवणीपासून आतापर्यंतची वाटचाल विचारांनी भारलेली आहेच..

     शेती व्यवसायाचा आणि तत्त्वज्ञानाचा संबंध काययाची दोन उत्तरे शक्य आहेत. पहिले असे की शेती करणे ही मूलभूत नतिक कृती आहे. त्यामुळे शेतीचे नीतिशास्त्र रचणेत्या शास्त्राची बौद्धिक मांडणे करणे यातून शेतीचा तत्त्वज्ञानाशी संबंध येतो. दुसरे म्हणजे शेती करण्यामागील मानवी बौद्धिक श्रम लक्षात घेऊनच शेतीचे तत्त्वज्ञान ही नवी ज्ञानशाखा विकसित होते. ही मांडणी लिंडसे फालवेय् (१९५०) या ऑस्ट्रेलियन विचारवंताने केली. 
     शेतीचे नीतिशास्त्र ही मुख्यत सार्वजनिक धोरणांशी निगडित असलेल्या नैतिक समस्यांवर शक्य असलेल्या उपाययोजनांची तात्त्विक आणि नैतिक दृष्टिकोनातून चर्चा करणारी उपयोजित नीतिशास्त्रातील नवी उगवती उपशाखा आहे. अन्नाचे उत्पादन आणि इतर औद्योगिक उत्पादनासाठी नसíगकजैविक साधनसंपत्ती यांचा वापर केला जात असताना दूरदर्शीपणारास्तपणा आणि मानवी चेहरा टिकविणारे व्यवस्थापन कसे होईलयाच्याशी ते निगडित आहे. शेतीविषयक धोरणे ही नेहमीच सार्वजनिक धोरणे असतात,याचे भान शेतीचे नीतिशास्त्र विकसित करते.
     बेन मेफम (विद्यमान) या शेतीतज्ज्ञ आणि तत्त्ववेत्त्याच्या मतेइतर कोणत्याही उद्योगधंद्यातील उत्पादनापेक्षा 'अन्नहे शेती संस्कृतीचे उत्पादनाचे स्वरूप मूलत वैशिष्टय़पूर्ण आहे. इतर मानवी उत्पादनाच्या तुलनेत अन्न हे प्रत्येक मानवाला आणि मानवेतर जिवांना केवळ विधायक अर्थाने जगण्याचा मूलभूत हक्क देते. परिणामी अन्न हेच केवळ निखळनि:संशयनिसंदिग्धनिरपेक्षसुस्पष्ट नैतिक दर्जा असणारे एकमेवाद्वितीय उत्पादन आहे.
    शेतीच्या नीतिशास्त्राचे उद्दिष्ट सामाजिक कराराच्या संदर्भात सार्वजनिक धोरण ठरविणे आणि त्या धोरणाचा सविस्तर आराखडा निश्चित करण्यासाठी समर्पक ठरू शकेल अशीसुसंगत आणि एकात्म नतिक चौकटीची योजना करणेहे आहे. इथे सामाजिक करार याचा अर्थ सामाजिक सहकार्यकायदेशीर रक्षण आणि उचित प्रशासन राबविण्याकरिता समाजातील सर्व सदस्यांनी एकमेकांत केलेला अलिखित करारनामा असा आहे. असा करार लोकशाहीतच कल्पनीय असल्यानेशेतीचे नीतिशास्त्र ही लोकशाही जीवनशैलीतच शक्य असणारी तात्त्विक विचारसरणी आहे. गरिबातील गरीब नागरिकालाही परवडणारे सुरक्षितपोषक अन्न पुरविणे हे लोकशाहीचे काम असते. त्यामुळे करार करणाऱ्या विविध व्यक्तीसंस्था आणि शासन यांच्यात टोकाचे मतभेद असले तरी ते किमान मुद्दय़ावर एकत्र येणेहे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी नेहमीच हितावह असेलअशा सामंजस्याचा सामाजिक करार राबविला गेला पाहिजे. मेफमच्या मतेया प्रक्रियेत नतिक भूमिका म्हणजे योग्य धोरणे ठरविणे हे नाही तरप्रस्तावित विशिष्ट धोरणे नैतिकदृष्टय़ा स्वीकारणे समर्थनीय आहेत की नाहीत याचे मूल्यमापन करण्यासाठी मदत करणारे नैतिक सिद्धान्त रचणे असते. 
       मेफमच्या निरीक्षणानुसार जमिनीची मालकीजमिनीचे शोषण आणि या शोषणाचा तिच्या उपजक्षमतेवर होणारा परिणाम या तीन मुख्य घटकांमधून शेतीविषयक अनंत नतिक समस्या उद्भवतात. मेफमच्या मतेशेतीविषयक नैतिक समस्यांचे तीन गट आणि शेतीविषयक नैतिक सिद्धान्ताचे असे दोन गट अधोरेखित करता येतील. यापैकी 'नतिक समस्यां'चे उपगट असे: (१) आíथक-सामाजिक रचना [न्याय कुणालाकसा?](२) जैवनीतिशास्त्रीय दृष्टिकोन [प्रामुख्याने जैवतंत्रज्ञानाच्या उपयोजनामुळे व इतर प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या.](३) शेती-पर्यावरणीय दृष्टिकोन [शेतीचा भौतिक तसेच सामाजिक पर्यावरणावर होणारा परिणाम ].
   नैतिक सिद्धांताचे असे दोन गट असे : (२)प्रक्रियाकेन्द्री आणि (२) आशयकेन्द्री.  प्रक्रियाकेन्द्री नैतिक सिद्धान्त म्हणजे घेतले जाणारे निर्णय गटबाजीचे व हितसंबंधी आहेत की सार्वजनिक हिताचे आहेतयापेक्षा निर्णय कसे घेतले जातात याच्याशी संबंधित असणारे (वैधानिक बहुमतशेतकऱ्यांच्या वा राजकीय संघटनापक्ष तसेच एखाद्या उद्योगसमूहाचा विविध प्रकारचा दबाव वा छोटय़ा गटात 'दादा'गिरीसाहेबांचे 'एक'मत). आशयकेन्द्री नैतिक सिद्धान्त म्हणजे प्रस्तावित धोरणांचा तपशीलवार आशय विचारात घेऊन रचला जाणारा सिद्धान्त (उपयुक्ततावादी किंवा कर्तव्यतावादी). दुसऱ्या प्रकारचे पुन्हा आणखी काही उपप्रकार आहेत.
पॉल थॉमसन या अमेरिकन शेतीनीतिज्ञाच्या मतेशेतीच्या नीतिशास्त्रात अभ्यासल्या जाणाऱ्या समस्यांचे तीन विभाग आहेत : (१) मानवी आरोग्य आणि सुरक्षा (२) पर्यावरण ऱ्हासाचा व्यापक प्रश्न (३) एक जीवनमार्ग म्हणून आणि कुटुंबचालीरीती इ. विविध सामाजिक संस्थांशी असलेला शेतीचा संबंध पाहता शेतीची सांस्कृतिकऐतिहासिक आणि सामाजिक उचितताहे आहेत. पहिला विभागसाधे रोजचे जेवणठरविलेला आहारपोषण व अन्न सुरक्षा याच्याशी निगडित आहे. दुसरा विभागशेतीविषयक पर्यावरणीय व्यवस्था आणि त्या बाबतचे माणसाचे उत्तरदायित्व (प्राण्यांचा जगण्याचा हक्कशाकाहारवाद इ.)तिसरा विभागशेतीचे औद्योगिकीकरणाशी (कॉर्पोरेटीकरण) निगडित आहे.
      थॉमसनच्या मतेशेतीविषयक नैतिक विचारांचा इतिहास झेनोफोन (इ.स.पू. ४४४-३७५) आणि अ‍ॅरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४-३२२) यांच्यापासून सुरू होतो. मग तमोयुगाचा काळ वगळता हा इतिहास लॉर्ड फ्रान्सिस बेकन (१५६१-१६२६) पासून पुन्हा सरू होतो. बेकनने विज्ञान आणि शेतीविकास या संबंधात पहिले सविस्तर यथार्थ लिखाण केले. लागवड-मशागतीचा पहिला वैज्ञानिक ग्रंथराज शेतीतज्ज्ञ जेथ्रो टूल (१६२७-१७४१) याने १७३३ साली लिहिला. जॉन लॉक (१६३२-१७०४)मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५)हेगेल (१७७०-१८३१)थॉमस माल्थस (१७६६-१८३४)बेंथम (१७४८-१८३२)जॉन स्टुअर्ट मिल (१८०६-१८७३) यांनी विविध अंगांनी शेतीविषयक मतप्रदर्शन केले. तथापि अनेक गतकालीन तत्त्ववेत्त्यांच्या शेतीविषयक लेखनाकडे समाजाचे आणि शासनाचे दुर्लक्ष झालेअशी खंत थॉमसन व्यक्त करतो. विज्ञान-तंत्रज्ञानाशी लगटून असूनही शेतीच्या नीतिशास्त्राच्या तात्त्विक इतिहासात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. 
      त्यानंतर थेट विसाव्या शतकात ग्लेन एल जॉन्सन (१९१८-२००३) या शेती अर्थशास्त्रज्ञाने शेतीविज्ञानावर अनेक चांगल्याविधायक लेखमाला लिहिल्यानंतर या विषयाकडे लोकांचे लक्ष गेले. वेन्डेल बेरी या कवी-कादंबरीकाराने लिहिलेल्या 'द अन-सेटलिंग ऑफ अमेरिका' (१९७७) या ग्रंथात औद्योगिक शेतीविद्यापीठांना मोठय़ा जमिनी दान करणे आणि आधुनिक शेतीविज्ञान यावर तात्त्विक मर्मग्राही टीका केली. त्यामुळे तत्त्ववेत्त्यांचे शेतीतील नतिक नैतिक समस्यांकडे लक्ष वेधले गेले. लिबर्टी बेले (१८५८-१९५४) हा अमेरिकन शेतीशास्त्रज्ञसर अल्बर्ट हॉवर्ड (१८७३-१९४७) यांच्या 'अ‍ॅन अ‍ॅग्रिकल्चरल टेस्टामेंटआणि 'सॉइल अँड हेल्थ' या ग्रंथांनी मोठी क्रांती केली. पीटर सिंगरओनोरा ओनील आणि अमर्त्य सेन (सर्व विद्यमान) यांनी भूकबळीची समस्या हाताळली. गॅरेट हार्डीन (१९७५-२००३) आणि नॉर्मन बोरलॉग यांनी लोकसंख्या वाढ आणि अन्न उत्पादन प्रक्रियेतील तणावाचे विश्लेषण केले. राशेल कारसन (१९०७-१९७६) या विदूषीने शेतीच्या विषारीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणला. कॅरोलिन साख या विदूषीने आणि भारतात वंदना शिवा यांनी पहिल्यांदा शेतीचा स्त्रीवादी अभ्यास पुढे आणला. नंतर थॉमस रुहेरअ‍ॅलन रोसेनफिल्ड यांनी प्रथम शेतीचे नीतिशास्त्र ही नवी विद्याशाखा १९८० मध्ये शिकविण्यास सुरुवात केली. १९९० मध्ये गॅरी कॉमस्टॉक यांनी शेती नीतिशास्त्रावर शेकडो कार्यशाळा घेतल्या. पॉल थॉमसन हा पहिला तत्त्वज्ञ अधिकृतरीत्या टेक्सास- मध्ये शेती नीतिशास्त्रज्ञ म्हणून नेमला गेला. बेन मेफम यांनी १९९० मध्ये जागतिक परिषद आयोजित केली. १९९८ मध्ये प्रथम 'द युरोपियन सोसायटीफॉर अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड एथिक्स' स्थापन झाली. २००० मध्ये ' द जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड एन्व्हायर्न्मेंटल एथिक्स'चा पहिला अंक दिमाखात प्रकाशित झाला. 'एन्सायक्लोपीडिया ऑफ फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर एथिक्स 'ची पहिली आवृत्ती १९९८ मध्येच आली होतीतर या वर्षी - २०१४ साली त्याची नवी आवृत्ती आली. 
    भारतात काय घडले ते पुढील लेखात !